२४ वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

संघर्ष मराठी २४ न्युज साठी गणेश वाघ

आदर्श विद्यालय पळसपूर येथील दहावी २०००/२००१ बॅचचा २४ वर्षांनी गेट टुगेदर उत्साहात साजरा.

प्रतिनिधी - गेट - टुगेदर म्हणजे माजी विद्यार्थी  एकत्र येणे. गेट टुगेदरमध्ये जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो आणि नात्यातला स्नेह जपला जातो. गेट टुगेदरमध्ये विद्यार्थी कला, परंपरा, संस्कृती जपली जाते.

पारनेर तालुक्यातील पळसपूर येथील  आदर्श विद्यालयाच्या इयत्ता दहावी (२०००-२००१) बॅचचा गेट-टुगेदर तब्बल २४ वर्षांनंतर यशोधन ॲग्रो टुरिझम, नारायणगाव येथे उत्साहात पार पडला. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी  वय, पद, प्रतिष्ठा, कामाचा व्याप बाजूला ठेवून  सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले. आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी विद्यार्थी / विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदाचे क्षण साजरे केले.

कार्यक्रमाचे आयोजन  कानिफनाथ आहेर आणि राजेंद्र आहेर यांनी केले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ज्योतीताई झावरे/जाधव मॅडम यांनी हृदयस्पर्शी शब्दांत सादर केली, तर संपूर्ण गेट-टुगेदरचे प्रभावी निवेदन श्री संभाजी भाईक सर आणि श्री संदीप पुरी सर यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर रेश्माराणी पठारे/आवळे मॅडम यांनी "देवा श्री गणेशा" या गीतावर सुंदर नृत्य सादर करून वातावरण भारावून टाकले. या खास दिवशी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

स्मरणीय क्षणांचे जतन करण्यासाठी सर्व क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक खास गोडवा प्राप्त झाला.

यशोधन ॲग्रो टुरिझम, नारायणगाव येथील निसर्गरम्य वातावरण, उत्तम भोजन व्यवस्था, सुशोभित गार्डन आणि अद्वितीय आतिथ्यामुळे कार्यक्रम आणखी संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल यशोधन ॲग्रो टुरिझमचे आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी, हसण्याखेळण्यात हरवलेले क्षण, आणि आठवणींनी भरलेला हा दिवस सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहतील, अशी भावना श्री. दत्तात्रय हरीभाऊ भाईक यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने