'स्वराज्य सप्ताह’ म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जागर-आमदार काशिनाथ दाते

संघर्ष मराठी २४ न्युज साठी गणेश वाघ
प्रतिनिधी - छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोचविण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसने स्वराज्य सप्ताहानिमित्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने"राज्य रयतेचे जिजाऊंच्या शिवबाचे"’ या टॅगलाईनखाली आयोजित स्वराज्य सप्ताह म्हणजे शिवरायांच्या विचारांचा जागरच म्हणावे लागेल, असे प्रतिपादन आमदार काशिनाथ दाते सर यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित स्वराज्य सप्ताह निमित्त  झालेल्या कार्यक्रमात आमदार दाते बोलत होते.पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने  शिवजयंती सोहळा व स्वराज्य सप्ताहाचा शुभारंभ पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला आहे.

या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत दादा गायकवाड, तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर , मा. नगराध्यक्ष विजुभाऊ औटी , जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष कापसे सर, महिला तालुकाध्यक्ष सुषमा रावडे , युवक तालुकाध्यक्ष भास्कर उचाळे , युवती तालुकाध्यक्ष अपर्णा खामकर, निघोज येथील विठ्ठलशेठ कवाद, आप्पासाहेब कळमकर, समीर झगडे,सुधीर करंजुले मेजर आदी मान्यवरांसह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महापुरुषांचे विचार, राष्ट्रवादी जपणार

आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ध्यानात ठेवून प्रत्येक कामातून स्त्रीशक्तीचा सन्मान राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  करत आहेत.त्याच अनुषंगाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

विक्रमसिहं कळमकर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पारनेर तालुका.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने