ब्रिटीशकालीन शिव पानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चिती करा -शरद पवळे/ दादासाहेब जंगले(शिव पानंद शेतरस्ता चळवळ महाराष्ट्र राज्य)

प्रतिनिधी - सरकार बदलते शासन निर्णय बदलतात परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावनी होत नाही यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन शेतकर्‍यांच्या समस्या समजुन  घेत प्रशासकीय ,न्यायालयीन पातळीवर काम सुरू केले असुन  शेतरस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी  उपजिल्हाधिकारी जाधव साहेब यांच्याकडे चळवळीच्या वतीने जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा,जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत,समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा,चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत,शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा,नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा, शेरस्त्याअभावी नापिक राहणाऱ्या भूधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्या,प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा,शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतस्ते करा,शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी ,विभाजन शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व पेरणी अंतर्मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेती पुरक व्यवसाय सर्पदंश विज पडणे पुर येणे आग लागणे यास्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना,शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आणत वेळोवेळी निवेदने आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या संदर्भात अमरावती जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी,शेत तिथे रस्ता व तहसीलवर शुन्य शेतरस्ता केस ठेवाव्यात अन्यथा हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहेत यावेळी अमरावती जिल्हयातील चळवळीचे प्रमुख 

प्रतिक सगणे विठ्ठलराव ठाकरे प्रकाशराव काळे तसेच प्रवीण ढेपे अथर्वे सगणे आदी शेतकरी उपस्थित होत ग्राम समृद्धीसाठी शेवटच्या शेतकऱ्याला शेतरस्ता मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे महाराष्ट्र राज्य 

शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या असुन भावाभावात, शेतकऱ्यांमध्ये शेत रस्त्यांच्या कारणामुळेआपापसात मोठे वाद निर्माण झाले असुन भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिव पाणंद शेतरस्ता चळवळ उभी केली असुन शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्‍याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिव पानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्यसमन्वयक दादासाहेब जंगले यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने