प्रतिनिधी - जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जिल्हाभरात ‘जलसंपदा आपल्या गावी' उपक्रम राबविण्यात येत असून या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या भूसंपादन व पुनर्वसनबाबतच्या अडचणीचे निराकरण करण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील गुरव चिंचोली येथे आयोजित संवाद कार्यक्रमात कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी शेतकऱ्यांना पाणी वापर संस्थाची कार्यपद्धती, बंद नलिका वितरण प्रणाली, पाणी वापर, सिंचन पाणीपट्टी वसूली आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करत त्यांच्या भूसंपादन व पुनर्वसनाबाबतच्या शंकाचे निरसनही केले.
यावेळी चिंचोली गुरव येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.
